Monday, July 20, 2020

सोमवती अमावास्येला या गोष्टींचे आहे महत्व



ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. अमावास्या प्रत्येक महिन्यात येते. पण, सोमवारी अमावस्या येण्याचा योग मात्र फार कमी वेळा येते. म्हणून सोमवती अमावस्या खास आहे.

या दिवशी १०८ वेळा तुळशीची परिक्रमा करणे फायद्याचे ठरते. त्याचसोबत 'ॐकार मंत्रा'चा जप करणे, सूर्य नारायणाला अर्घ्य देणे या सर्व गोष्टी कराव्या. इतकं सर्व करणे जमणार नसेल तर फक्त तुळशीला १०८ वेळा प्रदक्षिणा घालणेही तुम्हाला लाभदायक ठरू शकते.

धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावास्या भाग्याची अमावास्या असल्याचे सांगितले आहे. या अमावास्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे महात्म्य आहे. नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणे भाग्याचे मानले जाते.  त्याचसोबत गोदान, अन्नदान, ब्राह्मणाला भोजन आणि वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले आहे.
सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे याला अधिक महत्त्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी महत्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य नसेल तर घराजवळील कुंडात स्नान करावे आणि भगवान शिव, पार्वती आणि तुळशीची मनोभावे पूजा करावी. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांडवांच्या संपू्र्ण आयुष्यात एकदाही सोमवती अमावास्येचा योग आला नाही याची पांडवांना नेहमी खंत राहिली होती.

सोमवती अमावास्याः २० वर्षांनंतर अद्भूत योग; वाचा, व्रतकथा व महत्त्व

चातुर्मासातील पहिली अमावास्या सोमवारी आहे. यानंतर मराठी महिन्यात शिवपूजनासाठी सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या आणि व्रत-वैकल्यांची रेलचेल असणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होईल. चातुर्मासात सोमवारी अमावास्या येणे हा अद्भूत योग मानला जात आहे. चातुर्मासातील पहिला अमावास्येचा मुहूर्त, व्रतपूजाविधी, महत्त्व आणि मान्यता यांविषयी जाणून घेऊया...


सात्विकतेचा काळ मानल्या जाणारा चातुर्मासाला सुरुवात झाली असून, चातुर्मासातील पहिली अमावास्या सोमवारी आहे. सोमवती अमावास्येला सूर्यग्रहणाएवढे महत्त्व असते, असे मानले जाते. अमावास्या अशुभ असते, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. अमावास्येला अनन्य साधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो. अमावास्येला लक्ष्मी देवीचे नामस्मरण, उपासना आणि आराधना करणे शुभ मानले जाते. चातुर्मासातील ही पहिली अमावास्या आषाढ अमावास्या आहे. यानंतर मराठी महिन्यात शिवपूजनासाठी सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या आणि व्रत-वैकल्यांची रेलचेल असणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होईल. उत्तर भारतात श्रावण मासांरभ झाला आहे. त्यामुळे या अमावास्येला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अन्य राज्यांमध्ये मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. चातुर्मासात सोमवारी अमावास्या येणे हा अद्भूत योग मानला जात आहे. यापूर्वी ३१ जुलै २००० रोजी असा योग जुळून आला होता. आषाढी अमावास्येला दीप अमावास्या असेही संबोधले जाते. या अमावास्येला घरात दीप प्रज्ज्वलित करून संपूर्ण घर उजळवून टाकण्याची प्राचीन परंपरा आहे. चातुर्मासातील पहिला अमावास्येचा मुहूर्त, व्रतपूजाविधी, महत्त्व आणि मान्यता यांविषयी जाणून घेऊया...
अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे. पौराणिक मान्यतेनुसार, सोमवारी अमावास्या सुरू होणे, भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. महाभारत काळात पांडव वनवासात असताना त्यांना सोमवती अमावास्येचा लाभ कधीही घेता आला नाही, असे सांगितले जाते.

आषाढ महिन्यातील अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या असे संबोधले गेले आहे. श्रावण महिन्यातील शिवपूजन अधिक शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे.

सोमवती अमावास्याः २० जुलै २०२०

अमावास्या आरंभः १९ जुलै २०२० रोजी उत्तर रात्रौ १२ वाजून १० मिनिटे

अमावास्या समाप्तीः २० जुलै २०२० रोजी रात्रौ ११ वाजून ०२ मिनिटे

उत्तर भारतात श्रावण सुरू झाल्यामुळे ही अमावास्या श्रावण अमावास्या म्हणून साजरी केली जाणार आहे. याशिवाय सोमवती अमावास्येदिनी श्रावणातील सोमवार असल्यामुळे याचे महत्त्व दुपटीने वाढले आहे.


सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. म्हणूनच सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, अशीही मान्यता आहे. या दिवशी काही जण विशेष व्रत आचरतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सध्याच्या परिस्थितीत घरीच राहून शिवपूजन करावे. घरातील महादेवावर अभिषेक करावा. शिवपूजन झाल्यानंतर 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

श्रावण महिना माहिती

उद्या पासून श्रावण महिना सुरू होत आहे.


श्रावण महिना माहिती

अत्यंत पवित्र श्रावण महिन्याचा शुभेच्छा 

हिंदू पंचांगाचा प्रारंभ चैत्र मासापासून होतो. चैत्र मासापासून पाचवा महिना हा श्रावण मास असतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार या महिन्यातील पौर्णिमे पासून आकाशात श्रवण नक्षत्राचे योग तयार होत असते. त्यामुळे श्रावण नक्षत्राच्या नावा वरुन या महिन्याचे नाव श्रावण असे ठेवण्यात आले. या महिन्या पासून चातुर्मासची सुरूवात होते. तसेच हा महिना चातुर्मासातील चार महिन्यापैंकी अतिशय शुभ असा महिना मानला गेला आहे.धार्मिक द्दष्टीने चातुर्मासाचे खुप महत्व आहे. 

चातुर्मासात येणा-या चार महिन्यात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांमध्ये संत-महात्म्यांपासून ते साधारण व्यक्तीपर्यंत सगळेच धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमात व्यस्त झालेले आपल्याला दिसतात. या काळात हिंन्दू धर्मात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. या सर्वांची सुरूवात श्रावण महिन्यापासूनच करण्यात येते.

आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियाची व मुलीची खूप धावपळ असते. तेव्हा पासून एक-एकसण चालू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना आहे. ह्या महिन्यात देवाच्या कहाण्याचे तसेच पोथ्याचे वाचन करतात. ह्या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून श्रावण महिन्यातील व्रतांची माहितीमिळवली जाते.श्रावण महिन्यात रविवारी सुर्यनारायणची पुजा, नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्म हे दिवस महत्वाचे आहेत.
श्रावण महिन्यातील नाग पंचमी हा दिवस स्त्रीयासाठी मोठा सण आहे तसेच महाराष्ट्रात हा सण आनंदाने साजरा करतात. ह्या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. पूर्वीच्या काळी स्त्रिया वारुळा जवळ जावून पूजा करायच्या पण आता कालांतराने व शहरी करणामुळे वारुळे राहिली नाहीत. म्हणून आताघरीच नागाची मूर्ती तयार करून, किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली जाते.

नागाच्या मूर्तीला हळद-कुंकू लावून, दुर्वाफुले वाहून, लाह्या व दुधाचा नेवेद्य दाखवला जातो. ह्या दिवशी नागाची पूजा का करायची तर नाग देवता आपल्या कुळाचा, आपल्या पूर्वजांचा व आपल्या घराण्याचा रक्षण कर्ता आहे म्हणून आपण नाग देवाची पूजाकरतो. त्या दिवशी नाग देवाच्या फण्याला दुखवायचे नसते. त्या दिवशी वाटणे घाटणे करायचे नाही, विस्तवावर तवा ठेवायचा नाही. त्या दिवशी पुरणाची दिंड बनवून नैवेद्य बनवला जातो.

नाग पंचमी ह्या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळतात. लहान मुलीनं पासून मोठ्या स्त्रिया सर्व खेळामध्ये भाग घेतात. ह्या दिवशी रात्री जागरण केले जाते.

श्रावणातील सोमवार ह्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून शंकर भगवान् यांची पूजा केली जाते. पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा करून गोडाचा नेवेद्य बनवून मग उपवास सोडला जातो.

श्रावणातील मंगळवार हा तर नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी आनंदाचा दिवस. नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्ष श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी करतात. ह्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र येवून शंकरा भगवानच्या पिंडीची पूजा करून स्त्रीयांना हळदी कुकवाला बोलवून रात्री जागरण केले जाते. पहिल्या वर्षी पहिला मंगळवार माहेरी आईच्या घरी करतात. व नंतर पाच वर्ष सासरी करतात व शेवटच्या वर्षीउद्यापन करतात. रात्री जागरण करून वेगवेगळे खेळ खेळले जातात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, लाटण्याचा खेळ, गोफ, फेर हे खेळ खेळतात. खेळ खेळतांना गाणी म्हणतात.

नवीन लग्न झालेल्या मुलींना पतीचे नाव हे उखाण्यात घेण्याचा आग्रह धरला जातो. मंगळा गौरीला खेळ खेळतांना मुली आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेतात.

नारळी पौर्णिमा हा सण कोळी लोक मनवतात. ते आपल्याला रोजी रोटी देणाऱ्या समुद्राची पूजा करतात व नारळी पौर्णिमा हा दिवसनाच-गाणी म्हणून साजरा करतात. तसेच रक्षा बंधन हा सण महाराष्ट्रीयन लोकांचाआहे त्यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची हमी देतो.

श्री कृष्ण जन्मउत्सव: श्री कृष्ण जन्म हा रात्री साजरा केला जातो. त्या दिवशी उपवास केला जातो. दुसऱ्या दिवशी दही हंडी हा सण साजरा केला जातो.

धार्मिक कार्ये -

१) प्रत्येक सोमवारी - शिवपूजन

२) प्रत्येक मंगळवारी - मंगलागौरीचे पूजन

३) प्रत्येक बुधवारी - बुधाचे पूजन

४) प्रत्येक गुरुवारी - बृहस्पतीचे पूजन

५) प्रत्येक शुक्रवारी - देवीचे पूजन

६) प्रत्येक शनिवारी - शनि-मारुति-अश्वत्था(पिंपळा)चे पूजन

७) प्रत्येक रविवारी - आदित्याचे पूजन

Labels: